रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

डोक्याचा वापर

बंड्या एकदा कागद उडू नए म्हणून त्यावर ठेवायला जड़ वस्तु शोधत होता. 
तेवढ्यात त्याचे गुरूजी तेथे आले 
व त्याला म्हणाले :- अरे बंड्या काय शोधतोय ? 
बंड्या :- काही नाही सर कागदावर ठेवायला जड़ वस्तु शोधतोय!!.
गुरूजी :-सापडली काय? 
बंड्या :-नाहीना...... 
गुरूजी :-अरे मग डोक्याचा वापर कर ना.........

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

aaj sakali

फुलारे उघड उघड पाकळी
आज सकाळी बरोबर ५ वाजता जाग आली. पटकन आथरून सोडले सकाळचे प्रातविधी लवकर आटोपले व चहाचे अमृत घेऊन ५.३० वाजता फिरायला निघालो एकटाच. मुख्य रस्त्याला आल्यावर नेहमीचे लोक दिसले. त्याच्याशी राम राम झाल्यावर चालता चालता एक एक विषय निघू लागले म्हणजे राजकारणातील चालू घडामोडी  राजकारणातील राजकारण. तसं पहिलतर राजकारणात मला काही रस नाही. राजकारणातील माझा सहभाग फक्त  मतदाना पुरता कारण माझे स्पष्ट मत आहे कि आज काल जे राजकारणी लोक राजकारण करतात ते फक्त स्वार्थासाठी त्यांना ज्या समाजाने निवडून दिले त्या समाजाच्या भल्यासाठी नाही. जे पुढारी आपल्या स्वताच्या घरासमोरील  खांबावरील नगरपालिकेचा लाईट लावण्या मागे राजकारण करतात ते समाजाचे काय भले करू शकणार? असो
नंतर विषय निघाला तो काळ्या धनाचा! भारतातील लोकांनी जे विदेशामधील बँकामध्ये जो पैसा नेला त्याचा. खरतर इंग्रजांना जे करायला दीडशे वर्ष लागली ते भारतीय राजकारणी लोकांनी अवघ्या पन्नास वर्षात करून दाखविले त्यांनी काही हजार कोटी रुपये पन्नास वर्षात लुटून नेले हे जर पैसे भारतात परत आणले तर भारताची ओळख एक विकसित देश म्हणून जगाला होईल. प्रयत्न सुरु झाले आहेत पाहू काय होते ते कारण भारतीय राजकारणी लोकांचा अनुभव आपण गेले साठ वर्षे आपण घेत आहोत यांना निवडणुका आल्या कि सर्व विषय आठवतात. एकदा निवडून आल्यावर स्वार्थचे राजकारण करायचे असे वर्षानुवर्षे चालू आहे. 

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

माझा गांव

माझ गाव बुलडाणा

एक शांत शहर म्हणून याची ओळख.

फार पूर्वी येथे भिल्ल लोकांची वस्ती होती म्हणून याला भिल्लथाना म्हणत कालांतराने भिलथान्याचे बुलडाणा जाहले

सातपुड्याच्या कुशीत वसलेलं चारही बाजूनी हिरवे डोंगर 

या गावात ७५ टक्के सरकारी नौकारदार आहेत 

एके काळी हे गाव थंड हवेसाठी प्रसिद्ध होते परंतु आता गावाच्या भोवताली सिमेंटचे जंगल झाल्यामुळे व मोठ्याप्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे शहरात उष्णता जाणवते.

माझ्या गावात नौकारदार वर्ग असल्यामुळे जो तो आपापल्या कामात व्यस्त असतो बहुतेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर नौकारीतले शेवटची वर्ष यागावची निवड करून येथेच राहतात 

माझ्या गावात ना रेल्वे ना विमानतळ तरी या गावाची ओळख महाराष्ट्रात जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून आहे.

येथे सर्व जाती पंथाचे लोक राहतात राजकारणात हा मतदार संघ राखीव तरीही 

या माझ्या गावाची शैक्षणिक दृष्ट्या चांगली प्रगती झाली आहे एक वैद्यकिय शिक्षण सोडलेतर सर्वप्रकारचे तांत्रिक, अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची सोय येथे आहे 


सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

सूर्यनमस्कार

आज सकाळी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचायला मिळाली अमेरिकेत भारतीय सूर्यनमस्कार फार लोकप्रिय जहाले आहेत.तिथे  अनेक लोक आरोग्य लाभासाठी या प्राचीन भारतीय व्यायाम प्रकारचा फायदा घेत आहेत. तेथे एक हिन्दू स्वयंसेवी संघटनेने अमेरिकेतील ४० राज्यातील २२५ शहरामद्ये आयोजित शिबिरात जवळपास दहा हजार लोकानी आपली नावे नोंदवून घेतली पण आपल्याकडे म्हणजे भारतात या विषयी काहीच तलमल नहीं
माज्या माहिती प्रमाने फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या शाखेमद्ये शाश्त्रीय पध्तीने कसे करावयाचे हे शिकवते परन्तु आजकाल शाखेम्दये जाण्याचे टालले जाते सुर्यनामस्कराचे प्रसार रामदासस्वामिनी भारतभर केला त्यानी गावोगाव फिरून प्रत्येक गावात एकतरी मारोतीचे मंदिर असावे व त्यापुढे सूर्यनमस्कार काढावे सूर्य देवता ही शक्तिची वेवता आहे सूर्यनमस्कार काढून शक्तिची उपासना करावी हा त्यामागचा उद्धेश असावा. सूर्यनमस्कार म्हणजे ११ आसनाचा सुरेख मिलाप आहे.सकाळी सुर्योदयाच्या वेळी जर सूर्यनमस्कार काढले तर सर्वांगास व्यायाम होतो व दिवसभर ताजेतावाने व उत्साह राहतो.