मंगळवार, २९ मार्च, २०११

वाघाची संख्या वाढली......एक बातमी

आज जवळपास सर्वच दैनिका मध्ये एक चांगली बातमी वाचायला मिळाली की, देशामध्ये वाघाची संख्या २९५ ने वाढली. वाघांसाठी आरक्षित असणाऱ्या १७ राज्यातील ३९ प्रकल्पामध्ये एकूण १७०६ वाघ आढळले.सन २००६ च्या वाघांच्या गणणे नुसार देशात १४११ वाघ होते. चालू वर्षीच्या गणणे नुसार ही संख्या २९५ ने वाढून १७०६ इतकी झाली.जगातील एकूण वाघांपैकी जवळपास निम्मे वाघ भारतात आहे.वाघाची कमी होणारी संख्या ही सर्वच देश्यापुढे गंभीर समस्या होती.परंतु दूरदृष्टी समोर ठेवून केलेल्या उपाय योजनांचा हा परिणाम आहे.
झपाट्याने कमी होणारया जंगला मुळे जंगलातील प्राणी त्याची तहान-भूक भागवण्यासाठी लगतच्या गावात शिरतात.व गावकरी स्वताच्या जिवाच्या भीतीने त्यांना मारून टाकतात या मध्ये वाघाची संख्या जास्त असल्यामुळे देशभरातून वाघाची संख्या दिवसेंदिवस कमी होत होती परंतु सरकारी उपाय योजनेमुळे आता ही संख्या वाढू लागली आहे.भारतामध्ये वाघांच्या शिकारीवर बंदी असली तरीही वाघाच्या कातडीला चांगली किमत मिळत असल्या मुळे लपून छपून याची शिकार चालू आहे.पण सरकारच्या सतर्क वनविभागा मुळे अश्या प्रकारच्या शिकारीला खीळ बसला आहे.याचे परिणाम आता दिसू लागले आहे.जंगलाचा राजा जर जंगलातून कमी होत गेला तर जंगलात काहीच उरणार नाही.मागे आम्ही विदर्भातील ताडोबाच्या सफारीला गेलो होतो.तिथे दोन दिवस राहून वाघाचे दर्शन आम्हाला झाले नाही.त्यामुळे आम्ही सर्वच उदास झालो होतो परंतु पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा तेथे जाऊ तेव्हा आता आम्हाला नक्कीच वाघाचे दर्शन होईल. 

शनिवार, २६ मार्च, २०११

वैश्विक वसुंधरा तास

वीज हि कोणत्याही देशाची राष्ट्रीय संपत्ती असते.आज जगभरात जवळ जवळ १३१ पेक्षा जास्त देशामधील पाच हजार शहरात एक तास वीज बंद ठेवून "वैश्विक वसुंधरा" तास पाळण्यात येणार आहे.दर वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पाळण्यात येतो.या दिवशी रात्री ८.३० ते ९.३० काळात शहरातील सर्व वीज दिवे बंद ठेवण्यात येतात. याची सुरवात सन २००७ पासून ओस्ट्रेलिया या देशापासून झाली.सध्या जगातील सर्व देशांना गोबल वार्मिंग चा प्रश्न चांगला भेडसावत आहे. सर्वीकडे पृथ्वीवरचे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे.या मुळे बर्फाळ भागातील बर्फ सारखा वितळत असून पर्यावरणा साठी मोठा धोका निर्माण होत आहे.आज मानवाच्या जीवनात सकाळी झोपेतून उठल्या पासून  रात्री झोपेपर्यंत विजेच्या वापराचा अतिरेक झाल्यामुळे ग्लोबल वार्मिंग चे संकट जगासमोर उभे राहिले आहे.बहुतांशी देशा मध्ये वीज निर्माण करतांना कोळसा चा वापर करतात.या मुळे निर्माण होणारी राख सर्वत्र पसरते.त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांना श्वसनाचे आजार निर्माण होतात.

यावर महाराष्ट्र सरकारने भार नियमनाचा उपाय काढला आहे परंतु हे भार नियमन राज्यातील खेडे विभागात जास्त राबविण्यात येते. विजेचा जास्त वापर हा खेड्यात नसून शहरात आहे. शहरांना वीज कमी पडू नये म्हणून खेड्यात भारनियमन करण्यात येते. तेव्हा हा वैश्विक वसुंधरा तास शहरांसाठी किती महत्वाचा आहे. या एकतासात शहरातील मोठ मोठे कारखाने काही काळासाठी बंद राहतील आणि त्याच काळामध्ये वीज निर्माण करणारे उर्जा प्रकाल्पामधील निर्माण होणारी वीज खेड्याकडे वळवता येईल. या साठी आपण सर्व जन या सहभागी होवून राष्ट्राची संपत्ती वाचवू.


गुरुवार, २४ मार्च, २०११

भारतीय संघाचे अभिनंदन

Add caption
 भारतीय संघाने आज ओस्ट्रेलिया संघाला रोमहर्षक सामन्यात नमवून सेमी फायनल मध्ये  प्रवेश केल्या बद्दल सर्व खेळाडूचे विशेषत: युवराज हार्दिक अभिनंदन.आज खेळताना सर्व जन भारतासाठी खेळताना दिसले.उत्तम क्षेत्ररक्षण,गोलंदाजी,आणि सवोत्तम फलंदाजी.भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू आज विजयासाठी खेळत होता.आजचा सामना भारतीय संघासाठी करो व मरो अशाच होता.आणि भारताने तीन वेळा विश्व कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारवली.

सोमवार, २१ मार्च, २०११

ती......... एक दुपार

                     रोहन सकाळी नेहमी प्रमाणे लवकर ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला.तशी वीणा ही स्वयंपाकाला लागली.त्याचे लग्न होऊन जेमतेम दहा दिवस झाले होते. आणि आज रोहन लग्नाच्या सुट्टी  नंतर पहिल्यांदाच ऑफिसला निघाला होता. रोहन पुण्याला शिक्षणा साठी आला होता.तिथेच त्याला नौकरी पण लागली.तो कामात हुशार असल्या मुळे त्याला प्रमोशन पण मिळून तो मैनेजेर झाला. आधी तो ऑफिस जवळ दोघा पार्टनर सोबत रूम घेऊन राहत होता पण लग्न ठरल्या मुळे तो स्वतंत्र फ्ल्याट भाड्याने राहण्या साठी शोधत होता. बरीच शोधाशोध केल्या नंतर त्याच्याच कंपनीतील एका मित्राच्या बहिणीचा हा फ्ल्याट होता.ती नागपूरला राहत होती तिने आपल्या मुलाला पुण्यात शिक्षण घेण्यासाठी राहण्या करिता घेतला होता.हा फ्ल्याट त्याला फक्त तीन-चार महिन्या साठी मिळाला होता.फ्यात तसा मुख्य वसती पासून लांब व आजूबाजूला फार कमी वस्ती होती आजूबाजूचे बांधकाम अजूनही अपूर्ण अवस्थेत होते ह्याच्या फ्ल्याट च्या इमारती मध्ये एक दोन कुटुंब्ये राहावयास आली होती ह्याचा फ्ल्याट पाचव्या मजल्यावर होता व त्याच्या आजूबाजूचे सर्व फ्ल्याट खाली होते व तिसर्या मजल्यावर श्री साने राहत होते.त्याच्या कडे मोजून पाच माणसे राहत होती. गावी जाण्याच्या दोन दिवस अगोदर त्याच्या ताब्यात मिळाला होता.

                 टेबलावर जेवताना त्याने वीणाला सांगितले कि मी ऑफिसला गेल्यावर एकदम दरवाजा उघडू नको प्रथम आलेला व्यक्ती कोण आहे या बाबत नीट विचारपूस कर.खात्री झाल्याशिवाय दार उघडू नको.पेटीमधील डाग दागिने नीट कपाटात ठेऊन कुलूप लाव. दुपारी जरा सावधपणे झोप.फार भीती वाटलीतर खाली साने कडे जावून ये.त्याच्या सारख्या सूचना देणे सुरु होते ती फक्त कहाणी ऐकावी तशी हो म्हणून मान डोलवित होती.मनातून ती फार घाबरत होती. कारण तिला लग्ना अगोदर घरी कधीच एकटी राहाचे काम पडले नाही. तिच्या माहेरी एकत्र कुटुंब पद्धती असल्या मुळे सतत घरात कोणी सोबतीला असायचे.आणि घरचे लोग पण तिला एकटे ठेवत नव्हते. त्यामुळे एकट राहण्याचा प्रसंग लाग्नाधी तिच्यावर आलाच नाही.हि पहिलीच वेळ असल्यामुळे ती मनातून खूप घाबरली होती पण ती चेहर्या वरून तसे त्याला समजू देत नव्हती.

                 त्याने आपली bag घेतली व तो खाली आला त्याने जाता जाता साने काकूला वीणा घरी एकटी असल्या मुळे जरा लक्ष ठेवण्याची विनंती करून तो ऑफिसला निघाला.इकडे वीणाने जरा सामानाची आवारावर केली.सर्व दारे खिडक्या बंद आहेत याची खात्री करून तीने मासिक वाचायला घेतले.काल रात्री प्रवासात झोप न झाल्यामुळे तिला मासिक वाचत असताना तिचा केव्हा डोळा लागला तिला समजले नाही.

                 काही वेळाने दोन चोर समोरच्या दाराचे कुलूप तोडून तिच्या घरात शिरले. ते आपापसात कुजबुजत होते.कारण त्यांना ह्या घरात कोणीच राहत नाही अशी माहिती मिळाली होती परंतु वीणाला एकटे घरात पाहून तेही घाबरले होते. त्यापैकी एकाने वीणाला झोपेतून जागे केले.समोर दोन अनोळखी इसम पाहून ती पण घाबरली.ती मोठयाने ओरडणार तितक्यात एकाने तिचे तोंड दाबले व जवळील मोठा चाकू काढून तिच्या गळ्याजवळ धरला .ते सारखे तिच्या जवळ किल्याची मागणी करू लागले.पण ती देण्यास तयार होत नव्हती.एकाने जबरीने तिच्या कानातले ओढले त्यामुळे कानातून रक्त वाहू लागले.तरी पण तिने काही चाब्या दिल्या नाहीत.परत त्याने हातावर चाकूने दोन-तीन वार केले.सगळ्या कपड्यावर रक्त वाहू लागले. शेवटी तिने कपाटाच्या चाब्या बेड रूम मधील पर्स मध्ये असल्याचे सांगितले.दोघानीपण तिला खाली ढकलून बेड रूम कडे आपला मोर्चा वळवला. ते दोन चोर आत गेल्याचे पाहून तिने बेड रूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला.दोन्ही चोर आत मध्ये कोंडले गेले. तिने लगेच रोहनला मोबाईल लावला व घडलेली घटना सागितली.त्याला हे सर्व समजल्यावर त्याने लगेच साने काकांना फोन केला व घरी जाण्यास सांगितले व तो घरी निघाला.सानेकाका लगेच वर आले व त्यांनी वीणाला धीर देवून पोलिसांना फोन लावला.थोड्यावेळाने पोलीस आले व त्या चोरांना ताब्यात घेऊन गेली.रोहन घरी आला.वीणाच्या कपड्यावरील व खाली सांडलेले रक्त पाहून त्याला घडलेला प्रसंग किती भयानक होता.याची जाणीव झाली.पण वीणा ने ज्या हिमतीने व हुशारीने आलेल्या प्रसंगाला तोंड दिले.या बद्दल  त्याने तिचे कौतुक पण केले.त्याने तिला ताबडतोब दवाखान्यात नेले. व काही दिवसाने तो फ्ल्याट त्याने सोडून दिला.

रविवार, २० मार्च, २०११

टीम इंडियाला हार्दिक शुभेछा......!

आज ब गटातील सामना दुपारी अडीच वाजता भारत विरुद्ध वेस्ट इंडीज ह्यांचात चेनई येथील एम ए चिदंबरम मैदानावर होणार आहे. आज रंग पंचमी असल्यामुळे सचिन आज शतकांचे शतक पूर्ण करण्यासाठी धावांची उधळण करणार आहे. चेनईची खेळपट्टी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायद्याची साबित होणार आहे.असे क्रिकेट च्या जाणकारांचे मत आहे. भारतीय संघ जरी दुखापतीने ग्रासला असला तरी सर्व संघ एकीने खेळेल.अशी आशा आहे.मिस्टर माहीने आधीच्या सामन्यात केलेल्या चुका परत करणार नाही यातून तो बराच काही शिकला आहे.असे त्याच्या बोलण्यावरून वाटते.विरू व्याधीग्रस्त असल्यामुळे रैना ला व जाहिरच्या सोबतीला अश्विन ला संधी मिळू शकते.तिकडे पाकिस्थान्ने कांगारुणा हरविल्या मुळे आजच्या सामन्याला विशेष महत्व आहे.नागपूरच्या पराभातून बाहेर पडण्यासाठी आज विजय हवाच.


गेल्या तीन चार दिवसात भारतीय संघाने चांगला सराव केला असून टीम मानसिक आणि शाररीक दृष्ट्या एकदम फीट आहे. भारताने जर प्रथम गोलंदाजी घेतली तर त्यांचे लक्ष पहिल्या दहा षटकात वेस्ट इंडीज च्या तीन विकेट घेण्य कडे पाहिजे.इतर खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररक्षण करून एक एक धाव रोखली पाहिजे. दोन्ही संघाना आजचा सामना फार महत्वाचा आहे. त्याचाकडे गेल शिवाय इतर कोणी फार्मात नाही गेल ची विकेट भारताने लवकर घेतली पाहिजे. पाहू आता काय होते ते.

परत एकदा   टीम इंडियाला हार्दिक शुभेछा!


शनिवार, १९ मार्च, २०११

दानशूर कोण ?

                                                आज दुपारी बाजारातील जनरल स्टोअर्स मध्ये पेन विकत घेण्यासाठी गेलो.दुकानात गर्दी असल्यामुळे बराचवेळ प्रतीक्षा करावी लागली थोड्यावेळाने दुकान मालकाचे लक्ष माझ्याकडे गेले व तो म्हणाला, " काय पाहिजे? 
"मला एक चांगला पेन दाखवा." मी म्हणालो. 
व तो पेन आणायला आत गेला. 
                                          मी दुकानातील इतर वस्तू पाहत होतो.त्या दुकानात काचावर लावलेल्या एका सुविचारावर माझे लक्ष केंद्रित झाले. तो सुविचार होता. 
    ""जगामध्ये कर्णा पेक्षा मोठा दानी व्यक्ती कोण आहे? 
खालच्या ओळीवर लिहले होते 
"कंजूष व्यक्ती" कारण कि कंजूष व्यक्ती!
 आपले सर्व आयुष्य पै पै जोडण्या मध्ये घालवतो व शेवटी इतरांसाठी सर्व सोडून एकटाच निघून जातो.

                                               सदर सुविचार मी दोन तीन वेळा वाचला. तेवढ्यात दुकानदाराने माझ्या समोर सात आठ प्रकारचे पेन टाकले.त्यातील एक पेन मी निवडला व पैसे देऊन मी बाहेर पडलो. परंतु माझ्या मनातील तो कंजूस व्यक्ती काळी केल्या जात नव्हता. खरच एका बाजूने विचार केला तर आपण कमावलेला पैसा अडका त्याचा उपभोग आपण का नाही घ्यायचा.कशाला आपल्या पुढचा पिढीसाठी आपण पैसा कमवायचा.जसे देवाने पैसा कामवयासाठी   आपल्याला दोन हात दिले, तसे त्यानाही (पुढच्या पिढीला) पण दिले आहे या जगात तेही पैसा प्रतिष्ठा तेही कमावतील ज्याने तोंड दिले आहे तो घासही देईल. आजचा आलेला क्षण आपण जगायचं पुढच्या पिढीचे कोणी पहिले.

                                                नंतर लक्षात आले कि असाच जर विचार आपल्या आई वडिलांनी केला असता तर?, आपण लहान असताना आपल्याला तळहातावरील फोड प्रमाणे जपले.स्वताला परवडत नसताना देखील आपल्याला चांगल्या शाळेत शिकवले,आपल्या वर चांगले संस्कार आपल्याला चांगल्या समाज्याच्या लायक बनविले. जर त्यांनी आपल्याला चांगले शिक्षण दिले नसते तर आपण आज जे आहोत या पेक्षा खालचा दर्ज्यावर असतो.आपण आज जे काही आहोत ते त्यांनी  वेळोवेळी केलेल्या त्यागामुळेच.

                                                 वरील सुविचारातील कंजूस व्यक्ती प्रमाणात योग्य वाटते तरी पण आपल्या कमाई मधील पंचवीस टक्के रक्कम आपणावर खर्च करावी उर्वरित रक्कम पुढच्या पिढी साठी त्यांना फक्त अडी अडचणी मध्ये कामात येईल यासाठी ठेवावी.

बुधवार, १६ मार्च, २०११

पाणी व्यवस्थापन

उन्हाळा सुरु जाहला म्हणजे पाण्याची समस्या निर्माण होते. पाण्याचा वापर फार काटकसरीने करावा लागतो. कारण हिवाळ्याच्या शेवटी शेवटी विहिरी, बोअरवेल, नद्या,तलाव,धरणे आदी पाण्याचे साठे आटायला सुरवात होते. उन्हाळ्याचा सुरुवातीला याचा त्रास जाणवायला लागतो.नळाला येणारे पाणी फार जपून वापरावे लागते.या वेळी पाणी व्यवस्थापनची गरज वाटते.

पाण्याचे व्यवस्थापन पद्धतीचा वापर जर हिवाळ्याच्या सुरवाती पासून केला तर उन्हाळ्या मध्ये पाण्याची समस्या जरा कमी होते.कारण हिवाळ्याचा सुरवातीला नुकताच पावसाळा संपल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वर असते. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे रेन हार्वेस्टिंग करावे म्हणजे पडणारे पाणी घरच्या बोअरवेल,विहीर जवळ खड्डा करून गच्चीवर सर्व पाणी त्यात कसे साठवता येईल याची व्यवस्था करावी. स्वयंपाक घरात वापरण्यात येणारे पाण्याचे व न्हाणी घराचे बाहेर पडणारे पाणी यांचे वेगवेगळे बाहेर काढावे. स्वयंपाक घरातील पाणी घरासमोरील लावलेल्या झाडांना द्यावे.न्हाणी घरातले पाणी सार्वजनिक नालीने बाहेर काढावे.

उन्हाळ्यांत कुलरचा वापर फक्त दुपारी करावा.रात्री अंगणात किंवा गच्चीवर झोपावे. अंगणातील झाडांची सावली दुपारनंतर घरावर येईल अश्या रीतीने झाडे लावावीत.

सोमवार, १४ मार्च, २०११

फरक सांगा?

बंड्याला शाळेत पेपर सोडवताना प्रश्न आला.
Guarantee आणि Warranty यातील फरक उदाहरणासह लिहा ?
आम्हाच्या बंड्याने खालील प्रमाणे या प्रश्नाचे उत्तर लिहिले.
Guarantee म्हणजे एखादी वस्तू जर दिलेल्या मुदती मध्ये खराब झाली तर त्या बदल्यात बदलून मिळते. 
आणि Warranty म्हणजे एखादी वस्तू जर दिलेल्या मुदती मध्ये खराब झाली तर, तीच वस्तू दुरुस्त करून परत वापरण्या योग्य करतात. आता उदाहरण द्यायचे झाल्यास, समजा लग्न झालेली मुलगी सासरी चांगली वागत नसेल तर तिच्या माहेरची मंडळी तिला समजावून सांगतात असे वागायचे नाही.सर्वांशी चांगली वाग वैगेरे वैगेरे............. सांगून तिची रवानगी सासरी करतात. तर हि झाली Warranty. 

आणि माहेरची मंडळी जावयाला म्हणतात जर ही मुलगी चांगली वागत नसेल तर हिच्या लहान बहिणीला घेऊन जा ही झाली Guarantee. 

रविवार, १३ मार्च, २०११

बाजार

खेडे गांवात दर आठवड्याला भरणाऱ्या बाजाराचे खूप महत्व आसते.कारण खेडे गावाचे आर्थिक व्यवहार शेतीतून निघणार्या मालावर अवलंबून असतात.शेतात धान्यासाबोत भाजीपाल्याचे पिक घेवून दर आठवड्याच्या बाजारात  विकून पैसा कमवायचा जोड धंदा शेतकरी करीत असतात. कारण भाजीपालाचे पिक हे नगदी पिक आहे. अश्याच एका गावातील शेतकर्याची ही कथा (व्यथा ) आहे.

आज सकाळी सदाशिव भल्या पहाटे उठला. सकाळचे कामे आटोपती घेऊन त्याने कालच शेतातून काढलेल्या भाजी पाल्याचे पोते बांधावयास घेतले.शेवंता त्याला त्याचा कामात मदत करीत होती. त्याची पोर अजून झोपेतच होती. सदाशिव एका यंत्रा प्रमाणे काम करीत होता, पण त्याच्या मनात दुसरेच विचार चालू होते. आज बाजारात भाजी विकून आलेल्या पैश्यामध्ये जवळचे काही पैसे घालून साकाराकडून वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेल्या ६०००० रुपये कर्जाचा शेवटचा हप्ता देवून त्याच्या कडे गहाण ठेवलेली दीड एकर शेती सोडवायची होती.परवाच सावकाराची माणसे येवून त्याला कर्जाच्या हप्त्या विषयी दम देवून गेली होती.  

या वर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे पीकही चांगले आणि भाजीपाला पिकला होता.त्याच्या वडिलांना कॅन्सर झाल्या मुले ऑपरेशन करावे लागले परंतु ते काही त्यातून वाचले नाही. आता सावकाराचे कर्ज कसे परत करायचे हा त्याच्या समोर प्रश्न होता.गेल्या दोन तीन हंगामात पावसाने दगा दिल्या मूळे शेतात पिक ही घरात खाण्यापुरतेच झाले.शेवंता पण मजुरी साठी दुसर्याच्या शेतात कामाला जात होती या परिस्थितीत कर्ज
 कसे फेडणार याच विवंचनेत तो होता या परीस्थित त्याला साथ दिली ती त्याचा मित्र दौलत ने.दौलतने त्याला शेतात विहीर खोदण्यासाठी सरकारच्या योजनेची माहिती सांगितली.व त्या साठी त्याने सदाला वेळोवेळी मदत पण केली. शेतात विहीर खोदल्या मूळे तो पिकाबरोबर भाजीपाला पण पिकवू लागला.व त्याने थोडे थोडे करून सावकाराचे कर्ज पण फेडत आणले आता शेवटचा हप्ता देऊन सावकाराच्या तावडीतून शेत सोडवायचे व एक बैलगाडी विकत घ्यायची  हा एकच विचार त्याच्या मनात होता. शेवन्ताच्या हाकेने तो भानावर आला.कारण बाहेर दौलत बाजारात घेवून जाण्यासाठी हाका मारीत होता.

त्याने भरभर सर्व पोते गाडीत टाकले व दोघेही तालुक्याच्या बाजारात जायला निघाले.शेवंता पण त्याच्या लहान होणाऱ्या आकृतीकडे बराचवेळ बघत बसली.तिलाही पण सावकाराच्या कर्जाची जाणीव होती. ती सर्वथाने सदाशिवाची साथ देत होती.गेल्या दोन वर्षापासून घरात त्यांनी दिवाळी पण खर्या आनंदाने साजरी केली नव्हती.

सदाशिव व दौलत दोघेही बाजारात पोहचले व आपापले दुकान लावण्यात मग्न होते. बाजार पण चांगला भरला.पाहता पाहता गर्दी चांगली वाढू लागली.नेहमी प्रमाणे इतर भाजीवाल्या पेक्षा सदाशिव चा माल चांगला व ताजा असल्यामुळे त्याच्या दुकानावर गिऱ्हाईकाची जरा जास्त गर्दी होती. 

सदाशिव गीर्हयीकाशी बोलत असतांना बझारच्या दिशेने काही लोक धावत येताना दिसले काही समजण्याच्या आत ते लोक बाजारातील भाजीपाला इतरस्त्र फेकू लागले व जोरजोराने बंद करा बंद करा अश्या घोषणा देवू लागले. पाहता पाहता ते लोक सदाशिव च्या दुकाना पर्यंत आले व त्याच्या दुकानातील रचलेली भाजी रस्त्यावर फेकू लागले. काही क्षणातच सर्व भाजीपाला रस्त्यावर फेकला.सदाशिवने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु जमावातील लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.व ती निघून गेली पुढच्या दुकानाकडे .यात तो चांगलाच जखमी झाला.त्याला उठता पण येत नव्हते.व जखमी अवस्तेत तो रस्त्यावर पडलेल्या अस्ताव्यस्त पडलेल्या भाजी मध्ये त्याला सावकाराचा चेहरा, आपली शेती व बैलगाडी दिसू लागली.

शुक्रवार, ११ मार्च, २०११

सुसंगती सदा घडो

एक सुभाषित "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो" आपल्याला जर चांगली संगत मिळाली तर आपले विचार चांगले होतात. बालपणा पासून आपल्याला चांगले मार्गदर्शन करणारे मित्र, शिक्षक, लोक भेटले तर त्यांच्या संगतीने आपल्याही आयुष्याचे भले होते.आपल्याला भेटणार्या माणसामध्ये चांगले वाईट गुण असतात.किंवा चांगल्या-वाईट गुणाचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. त्या माणसामधील चांगले गुण हेरून त्याचा उपयोग आपल्या कसा होईल याचा विचार करावा या साठी शिक्षणाची गरज असते असे नाही याला पाहिजे व्यवहारी ज्ञान. 

सुसंगती बाबत फार पूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवते. जंगला मध्ये हिंडताना दोन मित्रांना एका पोपटाची दोन पिल्ये सापडतात.त्या दोघांचा व्यवसाय आसतो प्राण्याचे मांस विक्रीचा. त्या दोघा पैकी एकाने पिल्लू छान पिंजरा आणून आपल्या दुकानात ठेवले, व त्याला बोलायला शिकवू लागला ,तर दुसर्याने दुसरे पिल्लू देवळातील पुजार्याला देऊन टाकले.व तो आपल्या कामाला निघून गेला. पुजार्याने त्याला देवळाच्या गाभार्यातील पिंजर्या मध्ये ठेवून दिले. बराच काळ गेल्या नंतर तो जेव्हा देव दर्शनाला गेला तेव्हा त्याने पुजाऱ्या कडे पोपटा विषयी चौकशी केली. पुजार्याने त्याला सांगितले कि तुम्ही दिलेल्या पोपटाने मी म्हणतो ते सर्व मंत्र पाठ केले आहे. व तो माझ्या प्रमाणे दर्शनाला येणाऱ्या भक्तांची आदराने बोलतो. हे ऐकून त्याला फार आनंद झाला.व त्याने त्या पोपटाला चांगल्या माणसाच्या स्वाधीन करण्याचे सत्कृत्य केले या बाबत फार समाधान वाटले.

तसाच तो आपल्या मित्राला भेटायाला त्याच्या दुकानात गेला. तिथे गेल्यावर वेगळाच प्रकार त्याच्या लक्षात आला. त्या मित्राच्या दुकानातील पोपट रस्त्यावरून जाणार्या लोकांना शिव्या देत होता. दुकानात येणाऱ्या गीर्हयीकावर ओरडत होता. त्याला हे सर्व पाहून फार आश्चर्य वाटले कि एकाच पोपटाची हि दोन पिल्ये आहेत त्या पैकी एक जन शांत.सुस्वभावी सर्वांशी चांगला वागणारा आहे तर दुसरा स्वभावाने उग्र, शिव्या देणारा. हे पाहून त्याचे मन विचलित झाले. तो परत देवळात आला व त्याने झालेला प्रकार पुजार्याच्या कानावर घातला.

यावर पुजारी म्हणाला याला म्हणतात संगतीचा परिणाम.  एक जन देवळातील भजने, स्त्रोत्र -मंत्र एकूण तसे बोलू  लागला म्हणजे  चांगल्या लोकाच्या संगतीत राहून त्याने चांगले गुण घेतले या उलट दुसरे पिल्लू मित्राच्या दुकानात होते त्याचा व्यवसाय हा मांस विक्रीचा असून तो नेहमी त्याचं हात खालील लोकांना नेहमी शिव्या देऊन काम सांगायचा. त्या पोपटाच्या कानावर नेहमी अपशब्द पडत गेले. त्यामुळे त्या पिलाने ते लक्षात ठेवले.तर या पिल्ल्याचा कानावर नेहमी देवाचे नाव पडत होते त्याने ते लक्षात ठेवले.

म्हणून नेहमी चांगल्या लोकाच्या सहवासात राहावे.चांगल्या लोकांचा सहवास लाभल्या मुळे आपल्यालाही चार चांगल्या गोष्टी मिळतात.

गुरुवार, १० मार्च, २०११

काळ वेळ टाईम

आत्ताच्या क्षणाला आपण जगतोय, अनुभवतोय तो क्षण म्हणजे वेळ, काळ, टाईम. 
जगातील सर्वात बलवान कोणापुढे न झुकणारी, 
सर्वाना आपल्या मनाप्रमाणे वागवणारी, 
कोणालाही आपल्या पुढे जाऊ न देणारी,
सर्वाना एक समान वागणूक देणारी  
कोणासाठी न थांबणारी .......................

एकदा निघून गेलेली वेळ परत कधी येत नाही.किंवा ती परत आणता येत नाही.
प्रत्येक येणारा क्षण, वेळ हा शुभ असतो.केवळ त्या व्यक्तीचे विचार किंवा आचरण 
तिला शुभ किंवा अशुभ ठरवीत आसतात.दोन भिन्न व्यक्ती एकाच वेळी 
चांगल्या,वाईट प्रसंगाला सामोरे जात आसतात.एकाच गावात, शहरात,नगरात 
किंवा दोन शेजारी- शेजारी घरात एकाच वेळी चांगले वाईट प्रसंग घडतात.

तेव्हा आपण जीवनात आलेल्या प्रत्येक क्षण मध्ये आनंद शोधला पाहिजे.
कारण वाईट वेळ कायम राहत नाही.येणारा प्रत्येक क्षण आपल्याला 
नवीन अनुभव देऊन जातो.येणाऱ्या वाईट क्षणामध्ये भविष्यातील आनंद 
लपलेला आसतो.येणाऱ्या प्रत्येक क्षणाच सदुपयोग करून आपले जीवन सुखी करून घ्यावे.

मंगळवार, ८ मार्च, २०११

THE JOBS

This is the story about four people
named EVERYBODY, SOMEBODY, ANYBODY
and NOBODY.
There was an important job
to be done and
EVERYBODY was sure that
SOMEBODY would do it.
ANYBODY could have done it,
but NOBODY did it.
SOMEBODY got angry about that
because it was EVERYBODY job
EVERYBODY realized that EVERYBODY
would not do it. It ended up that
EVERYBODY blamed SOMEBODY
when actually accused ANYBODY.

ओळख

समाजात आपण वावरत असताना आपला संपर्क अनेक लोकांशी येत असतो, त्यातील सर्वच लोक आपल्या परिचयाची आसतात. असे नाही परंतु, ज्या लोकांशी आपला वारंवार संपर्क होता त्यांना आपण ओळखतो किंवा संबधित व्यक्ती आपल्याला ओळखते.कारण पहिले ओळख होते मग ओळखीचे रुपांतर मैत्रीत,नंतर नाते संबधात.
 
मानव नावाचा प्राणी जेव्हा जन्माला येतो, तेव्हा पासून त्याची ओळख पण जन्माला येते. मानव प्राण्याची पहिली ओळख म्हणजे पुरुष कि स्त्री नंतर अमक्याचा मुलगा किंवा मुलगी.नात किंवा नातू.वैगेरे ....

माणसाची ओळख निर्माण करण्यासाठी त्याचे शिक्षण व  त्याचा आजू बाजूं असलेला परिसर फार महत्वाचे काम करतो.काही लोकाच्या बाबती त्यांचे कार्य (कर्म) हि त्याची ओळख निर्माण करते.कारण त्यांनी केलेक्या सत्कार्मामुळे त्याची ओळख चिरकाल टिकते उदा. श्रीराम,श्रीकृष्ण,महाकवी कालिदास,तुलसीदास ई. हि झाली पुरातन उदाहरणे अलीकडच्य काळातील म्हणजे शिवाजी महाराज,स्वामी रामदास,संत तुकाराम असे अनेक नावे देता येतील कि ज्यांचे कर्म हीच त्यांची ओळख.

एकदा ओळख झाली कि त्याचा वापर स्वताच्या स्वार्थसाठी कसा करून घायचा या बाबतीत काही माणसे फार तरबेज असतात. आणि एकदा आपले काम झाले कि तू कोण अन मी कोण अशा व्यक्ती पासून सावधान राहिले पाहिजे. ओळखीचा वापर हा केवळ स्वार्थासाठी नाही तर समाजकारणा साठी झाला पाहिजे.