मंगळवार, ८ मार्च, २०११

ओळख

समाजात आपण वावरत असताना आपला संपर्क अनेक लोकांशी येत असतो, त्यातील सर्वच लोक आपल्या परिचयाची आसतात. असे नाही परंतु, ज्या लोकांशी आपला वारंवार संपर्क होता त्यांना आपण ओळखतो किंवा संबधित व्यक्ती आपल्याला ओळखते.कारण पहिले ओळख होते मग ओळखीचे रुपांतर मैत्रीत,नंतर नाते संबधात.
 
मानव नावाचा प्राणी जेव्हा जन्माला येतो, तेव्हा पासून त्याची ओळख पण जन्माला येते. मानव प्राण्याची पहिली ओळख म्हणजे पुरुष कि स्त्री नंतर अमक्याचा मुलगा किंवा मुलगी.नात किंवा नातू.वैगेरे ....

माणसाची ओळख निर्माण करण्यासाठी त्याचे शिक्षण व  त्याचा आजू बाजूं असलेला परिसर फार महत्वाचे काम करतो.काही लोकाच्या बाबती त्यांचे कार्य (कर्म) हि त्याची ओळख निर्माण करते.कारण त्यांनी केलेक्या सत्कार्मामुळे त्याची ओळख चिरकाल टिकते उदा. श्रीराम,श्रीकृष्ण,महाकवी कालिदास,तुलसीदास ई. हि झाली पुरातन उदाहरणे अलीकडच्य काळातील म्हणजे शिवाजी महाराज,स्वामी रामदास,संत तुकाराम असे अनेक नावे देता येतील कि ज्यांचे कर्म हीच त्यांची ओळख.

एकदा ओळख झाली कि त्याचा वापर स्वताच्या स्वार्थसाठी कसा करून घायचा या बाबतीत काही माणसे फार तरबेज असतात. आणि एकदा आपले काम झाले कि तू कोण अन मी कोण अशा व्यक्ती पासून सावधान राहिले पाहिजे. ओळखीचा वापर हा केवळ स्वार्थासाठी नाही तर समाजकारणा साठी झाला पाहिजे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा