रविवार, २० मार्च, २०११

टीम इंडियाला हार्दिक शुभेछा......!

आज ब गटातील सामना दुपारी अडीच वाजता भारत विरुद्ध वेस्ट इंडीज ह्यांचात चेनई येथील एम ए चिदंबरम मैदानावर होणार आहे. आज रंग पंचमी असल्यामुळे सचिन आज शतकांचे शतक पूर्ण करण्यासाठी धावांची उधळण करणार आहे. चेनईची खेळपट्टी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायद्याची साबित होणार आहे.असे क्रिकेट च्या जाणकारांचे मत आहे. भारतीय संघ जरी दुखापतीने ग्रासला असला तरी सर्व संघ एकीने खेळेल.अशी आशा आहे.मिस्टर माहीने आधीच्या सामन्यात केलेल्या चुका परत करणार नाही यातून तो बराच काही शिकला आहे.असे त्याच्या बोलण्यावरून वाटते.विरू व्याधीग्रस्त असल्यामुळे रैना ला व जाहिरच्या सोबतीला अश्विन ला संधी मिळू शकते.तिकडे पाकिस्थान्ने कांगारुणा हरविल्या मुळे आजच्या सामन्याला विशेष महत्व आहे.नागपूरच्या पराभातून बाहेर पडण्यासाठी आज विजय हवाच.


गेल्या तीन चार दिवसात भारतीय संघाने चांगला सराव केला असून टीम मानसिक आणि शाररीक दृष्ट्या एकदम फीट आहे. भारताने जर प्रथम गोलंदाजी घेतली तर त्यांचे लक्ष पहिल्या दहा षटकात वेस्ट इंडीज च्या तीन विकेट घेण्य कडे पाहिजे.इतर खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररक्षण करून एक एक धाव रोखली पाहिजे. दोन्ही संघाना आजचा सामना फार महत्वाचा आहे. त्याचाकडे गेल शिवाय इतर कोणी फार्मात नाही गेल ची विकेट भारताने लवकर घेतली पाहिजे. पाहू आता काय होते ते.

परत एकदा   टीम इंडियाला हार्दिक शुभेछा!


1 टिप्पणी:

  1. हा संघ इतका कर्मदरिद्री आहे की पराभव त्याच्यापासून लांब राहील

    उत्तर द्याहटवा