रविवार, २८ ऑगस्ट, २०११

" मी अण्णा हजारे आहे"

आज अण्णा च्या लढाईचा एक टप्पा पार पडला. सरकारने मजबुरीने का होईना संसदे मध्ये जन लोकपाल विधेयकाला पाठींबा दर्शविला.किवा आंदोलना पुढे सरकार दोन पाऊले मागे आली.आता आपली म्हणजे भारतीयांची एक जवाबदारी वाढली जो पर्यंत विध्येयक संसदेत पारित होऊन कायदा तयार होत नाही तो पर्यंत अण्णा जेव्हा जेव्हा आवाज देतील तेव्हा त्यांच्या पाठीशी असेच एक होऊन उभे राहायचं. 


आणि अजून एक काम करावयाचे अण्णाची टोपी म्हणजे " मी अण्णा हजारे आहे" लिहलेली हि पांढरी टोपी घालून आपले कोणतेही शासकीय काम आसो ते होत नसेल किंवा आपल्याला ते करण्या साठी लाच मागितली जात असेल सरकारी बाबू ते करण्यास टाळाटाळ करीत असेल हि टोपी घालून जाऊ.समोरचा सरकारी कर्मचारी वचकून जाऊन ते काम लवकर करेल.आश्या रीतीने आपला त्याचावर वाचक निर्माण होईल.अण्णांच्या भ्रष्टाचार संपविण्याच्या कार्यात आपला सहभाग असेल. आणि अण्णांनी लावली ज्योत आशीच तेवत राहील. 

रविवार, २१ ऑगस्ट, २०११

दुसऱ्या स्वतंत्र लढ्याची सुरवात


गेल्या काही महिन्यांपासून उघडकीस आलेल्या एकामागून एक घोटाळ्यातून शासन व्यवस्थेचा खरा चेहरा जनते समोर आला आहे. आपण ज्यांना मोठ्या विश्वासाने निवडून देतो ते आपले लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्या ऎवजी स्वतः ची तुंबडी भरण्यात मश्गुल झालेले आहेत.कारण निवडणूक असा धंदा आहे, कि त्यामध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि मग पाच वर्ष्यात किती तरी पटीने वसूल करता येतो.


आज संसदेत अर्धेअधिक प्रतिनिधी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तर काहीं वर न्यायालयात खटले चालू आहेत.खरे तर असे लोक आपण का निवडून देतो हा मुद्दा विचार करण्या सारखा आहे  आपल्या देश्यातील जनता ही रोजच्या कामात इतकी व्यस्त झालेली आहे. कि तिला आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव असून ती जाणीव पूर्वक त्या कडे दुर्लक्ष करीत आहे. पण आण्णा हजारेच्या सध्या सुरु आंदोलनावरून असे दिसून येते कि सामान्य जनता जागी झाली आहे देश्यात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त होवून ती रस्त्यावर उतरली आहे.कोणतेही आंदोलन हे घरात बसून होत नसते.अण्णांच्या या आंदोलनामध्ये सर्वात जास्त सहभाग आहे तो तरुणांचा.कारण कोणतेही आंदोलन तरुणांच्या सहकार्याने यशस्वी होत.


गेल्या काही महिन्यात उघडकीस आलेल्या घोटाळया मुले सर्व सामन्यात असणारा असंतोष व सरकारचा निर्णय घेण्यासाठी वेळ काढू पणा अश्यातच अण्णांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य लोकांच्या उद्रेकाला वाट मिळाली. आता नाही तर केव्हा नाही. अश्या विचाराने सामान्य जनता रस्त्यावर आली. हि तर सुरुवात आहे. स्वतंत्र आंदोलनाची सुरवात हि मंगल पांडे यांच्या उठवाने झाली होती तेव्हाची जनता पण इंग्रजांच्या जुलमाला कंटाळली होती. त्याला वाट मिळाली ती मंगल पांड्ये यांच्या उठावामुळे. आजही तशीच परिस्थिती निर्माण झाली.सरकारच्या नाकर्ते पणामुळे व भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारचा वेळकाढूपणा या मुळे सर्व जनतेत   रोष निर्माण झाला. म्हणून सर्वांनी आण्णांच्या आंदोलनाला पाठींबा देण्या साठी एकत्र आले. निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी शासन व्यवस्था नीट चालावी या साठी कायदे करावे.या कायद्याचा वापर सर्वसामान्याच्या भल्या साठी होईल अशी व्यवस्था निर्माण करावी. हा लोकशाहीचा उद्देश आहे. परन्तु सध्या उलटेच सुरु आहे. या सर्वांवर अंकुश ठेवण्य साठी अण्णांचे जन्लोक्पाल विध्येयक संसदेत पारित होणे गरजेचे आहे.

सोमवार, १ ऑगस्ट, २०११

बस एक नजर चाहिये

 गेल्या ६-७ महिन्यान पासून सेवाग्राम आश्रमातील लोक गांधीजींचा चष्मा शोधतात पण तो काही सापडत नाही. सेवाग्राम (वर्धा महाराष्ट्र राज्य) येथे गांधीजींचा आश्रम असून तेथे गांधीजीच्या वापरातील वस्तू ठेवल्या आहेत. त्या पैकी हा चष्मा होता तो काही महिन्या पासून हरवला आहे किंवा चोरीला गेला आहे. अजून पर्यंत काही सापडला नाही.सर्वी कडे शोधाशोध सुरु आहे. 


तस पहिलतर माणूस ज्या प्रकारचा चष्मा डोळ्यावर लावतो त्याला सारे जग तसे दिसते असे म्हणतात येथे चष्मा न लावता  नजर च मेली आहे. रस्त्याने आपण जाताना जर कोणाचा अपघात झाला किंवा कोणी संकटात दिसला तर आपण त्याला मदत करण्या ऐवजी उगाच फुकट वेळ जाईल, फालतू पोलिसांचे लचांड मागे लागेल,हे तर नेहमीचेच आहे हा विचार करून त्या कडे दुर्लक्ष करतो. याचा अर्थ असा कि आपली नजर मेली आहे.पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.मानवतेच्या गप्पा मारणारे आपण दुसर्याला मदत करण्याची वेळ आली कि आपण आपला फायदा काय याचा विचार करतो. 


गांधीजी चा सर्वानकडे माणूस म्हणून पाहायचे प्रत्येक माणसात ईश्वरी अंश आसतो नजर लागते फक्त ओळखण्याची,  हि नजर च हरविली आहे. अश्या नजर हरविलेल्या लोकांना हा चष्मा सापडेलच कसा. सकाळी उठल्यावर आपण वर्तमान पत्र वाचतो त्यामध्ये अपहरण,घोटाळा,खून अश्या बातम्या ठासून भरलेल्या आसतात आणि आपण मोठ्या चवीने त्या वाचत आसतो.व सरकारला दोष देवून आपल्या नियमित कामाला लागतो.


 जगात स्पर्धा वाढल्या मुळे प्रत्येक जन आपल्या कामात मग्न आसतो. अंतिम ध्येय हे पैसा असल्या मुळे तो जास्तीत जास्त कसा कमावता येईल या कडे सर्वांचे लक्ष आसते आपल्या आजूबाजूला काय घडत आहे या कडे आपले लक्ष नाही. पैसा कमविण्या साठी कोणत्याही थराला जायची आपली तयारी असते. यातूनच २ जी  सारखे घोटाळे जन्माला आले. सत्य, अहिंसा, परोपकार आदी गोष्टी खूप मागे पडल्या आहे. आणि ह्या गोष्टी समजविण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला कोणी जुमानत नाही. आपण जर आपली जर नजर (दृष्टीकोन) बदललात तर हा चष्मा नक्कीच सापडेल.