बुधवार, ४ एप्रिल, २०१२

उपाधी आणि कर्तुत्व

                               आज कोणते तरी दैनिक वाचत असताना एक बातमी वाचावयास मिळाली लखनो येथील १२ वर्षाच्या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडे महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता घोषित केल्या बाबतचा पुरावा दाखविण्या ची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली. यावर सरकारने उत्तर दिले कि या बाबत सरकारकडे काही पुरावा उपलब्द नाही. 

                                महात्मा गांधी यांचे संपूर्ण जीवन हे देश घडविण्याचा साठी व देश्यासाठी अर्पण केले. हे सर्व जगाला माहित आहे. माझ्या माहिती प्रमाणे महात्मा गांधीना सर्व प्रथम राष्ट्रपिता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संबोधिले व महात्मा हि उपाधी रबिन्द्रनाथ टागोर यांनी दिली. 

                                 काही शब्द हे त्या व्यक्तीचे कर्तुत्व दर्शवितात जसे छत्रपती हा शब्द उच्चारला कि त्यानंतर शिवाजी महाराजांचे नाव येते.आणखी उदाहरणे द्यावयाची झाल्यास ती पुढील प्रमाणे देता येतील 

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम,
 राजर्षी शाहू महाराज, 
धर्मवीर संभाजी राजे,
महर्षी धोंडो केशव कर्वे, 
लोकमान्य बाल गंगाधर टिळक, 
समाजसुधारक आगरकर,
आचार्य अत्रे,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, 

अगदी अलीकडील काळातील उदाहरणे म्हणजे 

महानायक अमिताभ बच्चन,
गानकोकिला लता मंगेशकर 

                                        सांगायचे तात्पर्य इतकेच कि ज्याच्या त्याचा कर्तुत्वामुळे त्याला समाज ओळखतो आणि तश्या उपाध्या ह्या देत असतो या बाबत कुठेही लेखी पुरावा आढळत नाही आणि सापडनारही नाही.अश्या प्रकारची माहिती मागून माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग कोणी करू नये. कारण माहितीचा अधिकार हे एक शस्त्र आहे हे कोठेही वापरून त्याची धार बोथट करू नये 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा