रविवार, २१ ऑगस्ट, २०११

दुसऱ्या स्वतंत्र लढ्याची सुरवात


गेल्या काही महिन्यांपासून उघडकीस आलेल्या एकामागून एक घोटाळ्यातून शासन व्यवस्थेचा खरा चेहरा जनते समोर आला आहे. आपण ज्यांना मोठ्या विश्वासाने निवडून देतो ते आपले लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्या ऎवजी स्वतः ची तुंबडी भरण्यात मश्गुल झालेले आहेत.कारण निवडणूक असा धंदा आहे, कि त्यामध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि मग पाच वर्ष्यात किती तरी पटीने वसूल करता येतो.


आज संसदेत अर्धेअधिक प्रतिनिधी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तर काहीं वर न्यायालयात खटले चालू आहेत.खरे तर असे लोक आपण का निवडून देतो हा मुद्दा विचार करण्या सारखा आहे  आपल्या देश्यातील जनता ही रोजच्या कामात इतकी व्यस्त झालेली आहे. कि तिला आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव असून ती जाणीव पूर्वक त्या कडे दुर्लक्ष करीत आहे. पण आण्णा हजारेच्या सध्या सुरु आंदोलनावरून असे दिसून येते कि सामान्य जनता जागी झाली आहे देश्यात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त होवून ती रस्त्यावर उतरली आहे.कोणतेही आंदोलन हे घरात बसून होत नसते.अण्णांच्या या आंदोलनामध्ये सर्वात जास्त सहभाग आहे तो तरुणांचा.कारण कोणतेही आंदोलन तरुणांच्या सहकार्याने यशस्वी होत.


गेल्या काही महिन्यात उघडकीस आलेल्या घोटाळया मुले सर्व सामन्यात असणारा असंतोष व सरकारचा निर्णय घेण्यासाठी वेळ काढू पणा अश्यातच अण्णांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य लोकांच्या उद्रेकाला वाट मिळाली. आता नाही तर केव्हा नाही. अश्या विचाराने सामान्य जनता रस्त्यावर आली. हि तर सुरुवात आहे. स्वतंत्र आंदोलनाची सुरवात हि मंगल पांडे यांच्या उठवाने झाली होती तेव्हाची जनता पण इंग्रजांच्या जुलमाला कंटाळली होती. त्याला वाट मिळाली ती मंगल पांड्ये यांच्या उठावामुळे. आजही तशीच परिस्थिती निर्माण झाली.सरकारच्या नाकर्ते पणामुळे व भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारचा वेळकाढूपणा या मुळे सर्व जनतेत   रोष निर्माण झाला. म्हणून सर्वांनी आण्णांच्या आंदोलनाला पाठींबा देण्या साठी एकत्र आले. निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी शासन व्यवस्था नीट चालावी या साठी कायदे करावे.या कायद्याचा वापर सर्वसामान्याच्या भल्या साठी होईल अशी व्यवस्था निर्माण करावी. हा लोकशाहीचा उद्देश आहे. परन्तु सध्या उलटेच सुरु आहे. या सर्वांवर अंकुश ठेवण्य साठी अण्णांचे जन्लोक्पाल विध्येयक संसदेत पारित होणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा