गुरुवार, १० मार्च, २०११

काळ वेळ टाईम

आत्ताच्या क्षणाला आपण जगतोय, अनुभवतोय तो क्षण म्हणजे वेळ, काळ, टाईम. 
जगातील सर्वात बलवान कोणापुढे न झुकणारी, 
सर्वाना आपल्या मनाप्रमाणे वागवणारी, 
कोणालाही आपल्या पुढे जाऊ न देणारी,
सर्वाना एक समान वागणूक देणारी  
कोणासाठी न थांबणारी .......................

एकदा निघून गेलेली वेळ परत कधी येत नाही.किंवा ती परत आणता येत नाही.
प्रत्येक येणारा क्षण, वेळ हा शुभ असतो.केवळ त्या व्यक्तीचे विचार किंवा आचरण 
तिला शुभ किंवा अशुभ ठरवीत आसतात.दोन भिन्न व्यक्ती एकाच वेळी 
चांगल्या,वाईट प्रसंगाला सामोरे जात आसतात.एकाच गावात, शहरात,नगरात 
किंवा दोन शेजारी- शेजारी घरात एकाच वेळी चांगले वाईट प्रसंग घडतात.

तेव्हा आपण जीवनात आलेल्या प्रत्येक क्षण मध्ये आनंद शोधला पाहिजे.
कारण वाईट वेळ कायम राहत नाही.येणारा प्रत्येक क्षण आपल्याला 
नवीन अनुभव देऊन जातो.येणाऱ्या वाईट क्षणामध्ये भविष्यातील आनंद 
लपलेला आसतो.येणाऱ्या प्रत्येक क्षणाच सदुपयोग करून आपले जीवन सुखी करून घ्यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा